शिल्पग्राम हॉटेलची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा.. माजी नगराध्यक्ष साळगावकर.
नगरसेवक उदय नाईक यांनी मतांच्या राजकारणासाठी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणे दुर्दैवी.
शिल्पग्राम हॉटेल ची जा समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी धिंगाणा घालून तोडफोड केली त्या समाजकंटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, नगरसेवक उदय नाईक यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा लोकांना पाठीशी घालने ही दुर्दैवी बाब आहे ,आपण या विरुद्ध आवाज उठवू व संबंधित हॉटेल मालकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिल्पग्राम हॉटेल च्या पाहणीनंतर बोलताना दिली.
काल रात्र पार्टीच्या नावाखाली हॉटेलच्या मॅनेजरशी वाद घालून तेथील सुरक्षा रक्षकाच्या केबिन घ्या काचा फोडून तसेच कुंडी फेकून मारून परिसरात धिंगाणा घालून सामानाची नासधूस केली, याबाबतचे वृत्त माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कानी जाताच त्यांनी शिल्पग्राम ला भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,अशोक पवार, माजी नगरसेवक सुरेश भोईटे,खान ,नगरसेवक बाबू कुडतरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुंडलिक दळवी यांनी हॉटेलमालक दळवी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेबाबत विचारणा केली, त्यावेळी त्यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नाही असे सांगितले,त्यावेळी पुंडलीक दळवी यांनी घडलेली घटना मालकांच्या कानी घातली यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिल्पग्राम स्थळी पोहोचले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरात यापूर्वी अशा घटना संबंधित व्यक्तींकडून घडल्या आहेत, एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्यामुळे अशा घटना व दादागिरी होतअसेल तर आपण त्या विरोधात उभे राहू अशा घटना सावंतवाडीत पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली जाईल असे स्पष्ट केले.
ज्या वेळी शिल्पग्राम बंद होते व ते चालवायला द्यायचे होते त्यावेळी मी चालवायला घेणारे दळवी यांना शब्द दिला होता तुम्ही हे हॉटेल आकर्षक बनवा पर्यटकांना यांची भुरळ पडली पाहिजे तुमच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन त्याच कर्तव्य भावनेतून ही घटना समजल्यानंतर आज या ठिकाणी आपण आलो असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.
यापुढे भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली जाईल ,ज्याने ही घटना केली ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत, त्याने केलेली शिवीगाळ हॉटेल मध्ये केलेली मोडतोड हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे असे साळगावकर यांनी स्पष्ट केले,तसेच नगराध्यक्ष संजू परब यांनी या घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते असे साळगावकर म्हणाले.

