पत्रे गेले जळून , अंतिमसंस्कार करताना लोक गेले भिजून..
_*🛑 पत्रे गेले जळून , अंतिमसंस्कार करताना लोक गेले भिजून..*_
_*🛑 तसेच वापरलेली N- 95 मास्क स्मशानभूमीत उघड्यावरच दिली फेकून..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१८ :-* साटेली- भेडशी सातेरी मंदिरा नजिक असलेल्या स्मशान भूमित पत्रे जळल्यामुळे स्मशान भूमित अंतिमसंस्कार करताना पावसाचे पाणी पडून अंतिमसंस्कार देखील निट करता येत नसल्याचे प्रकार घडत आहेत.
तसेच वापरलेले N- 95 मास्क स्मशान भूमिच्या आवारात उघड्यावरच टाकल्याचे दिसून आले.
अंतिमसंस्कार देखील निट करता येत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त किली जात आहे. त्यामुळे सरपंच यांनी यात विशेष लक्ष घालून अंतमसंस्कारासाठी करण्यात आलेली शेड पत्रे घालून व्यवस्थित रीत्य करून द्यावी अशी नागरिकां मधून मागणी होत आहे.

