🟥 आम्ही कणकवलीकर आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाने दिपावलीचे औचित्य साधुन उपजिल्हा रुग्णालयातील सेविका, कामगार वर्ग आणि डॉक्टरांसहित सर्वांचा केला सन्मान..
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴दि. ०९/११/२०२३:- रोजी आम्ही कणकवलीकर आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्रमंडळाने, अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार), संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व सर्व कर्मचारी वर्ग यांना दिपावलीचे औचित्य साधुन “अभ्यंगस्नानासाठी” आवश्यक साहित्य आदरपुर्वक प्रदान केले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि, रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला लवकरात लवकर बरं व्हायचं असतं, त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना ही परिस्थिती संपवुन लवकरात लवकर आपल्या कामावर जायचं असतं. रूग्णालयात दाखल केलंय म्हणजे आपली जबाबदारी संपली, डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाची सुरू झाली. हीच त्यांची भावना बनते, अवाजवी अपेक्षा वाढतात, रुग्णालयाचा “कर्मचारी वर्ग” करीत असलेले प्रयत्न सहाजीकच नजरेआड होत हक्क आग्रही माणुस कर्तव्यांकडे काणाडोळा करीत कायदा हाती घेतो. सातत्याने अशा परिस्थितीला सामोरे जात शासकीय आणि सार्वजनिक रूग्णालयातील आरोग्यसेवक जी सेवा देतात, त्याला तोंड नाही. अशा सातत्याने टीकेचे धनी होणाऱ्या आरोग्यसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द ही कमी पडतील. आवश्यक असेल तर “साद द्या, आम्ही तुमच्या सोबत नक्कीच राहु” असे आश्वासितही केले.
यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कधीही, केव्हाही, काहीही अडचणी असतील तर तुम्ही “फक्त हाक द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत” असे, आश्वासित केले. डॉक्टर्स कर्मचारी वर्ग आणि इतर सहकर्मचारीही या अनपेक्षित कृतीने भारावले गेले. सर्वांनीआभार व्यक्त केले.
त्यानंतर नगरपंचायतचे कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर व अस्थाई असुनही ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कणकवलीकरांना सेवा देतात. त्यांचीही दखल घेत किशोर धुमाळे यांच्या उपस्थितीत आम्ही कणकवलीकर आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने, दिपावलीचे औचित्य साधुन त्यांनाही “अभ्यंगस्नानासाठी” आवश्यक साहित्य आदरपुर्वक प्रदान केले.
या वेळी सर्व कर्माचारी वर्गाने मंडळाचे आभार मानले. या वेळी उपस्थित बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर, सईद नाईक, नंदु आळवे आणि सर्व मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

