🛑 अपूर्ण असलेल्या तिलारी प्रकल्पा बाबत येत्या ८ दिवसात अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारणार ; संजू परब
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी ता.२१-:* जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी ४० वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही तो प्रकल्प अपूर्ण आहे. याबाबत येत्या ८ दिवसात भाजपच्या शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे सर्व पदाधिकारी घेराव घालत जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी दिला आहे.

