◼️ना.सामंत व खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार प्रत्येकी १०००० लस..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-११ :- मा मंत्री श्री उदय सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेच्या सद्यस्थिती संदर्भात संचालक अर्चना पाटील यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली असून उद्या सकाळ पर्यत लस दोन्ही जिह्यात पोहचणार असल्याची माहिती दिली आहे याकरिता दोन्ही जिल्ह्यातून लस आणण्यासाठी आजच गाड्या पुण्याला रवाना होणार आहेत पुढेही लस कमी पडू नये याकरिता मंत्री उदय सामंत यांनी संचालकांना विनंती केली.
खासदार विनायक राऊत हे देखील दोन्ही जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेत असून ,लस उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहेत.

