कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंजिवडे पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकर सोडवावा -ग्रामस्थांची मंत्री दीपक केसरकर यांच्या कडे मागणी

आंजिवडे पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकर सोडवावा -ग्रामस्थांची मंत्री दीपक केसरकर यांच्या कडे मागणी

सावंतवाडी : कोल्हापूर सिंधुदुर्ग ला जोडणाऱ्या जवळचा असा आंजिवडे पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकर सोडवा अशी मागणी पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे सहयाचे निवेदनही त्यांना देण्यात आले.
मंत्री केसरकर हे पाटगाव येथे आले असता सरपंच विलास देसाई नंदकुमार ठाकूर यांच्यासह अजिंक्य ग्रुप कला क्रिडा मंडळाने स्वागत केले त्यानंतर त्यांनी भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच सार्वजनिक गणपती बरोबरच घरगुती गणपती ही दर्शन घेतले. त्यादरम्यान त्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले तसेच घाटमार्गा बाबत चर्चा केली. आंजिवडे घाटमार्ग झाला तर पाटगाव चा पर्यटनदृष्ट्या विकास होईल पाटगाव व आंजिवडे पासून काहि अंतरच घाटमार्ग आहे हा अत्यंत कमी घाटमार्ग असल्याने शासनाला कमीत कमी खर्चात मार्ग करता येईल शासनाचा निधी ही कमी लागेल आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूचा विकास होणार आहे. असे ग्रामस्थांकडुन सांगण्यात आले व तसे निवेदन ही दिले.
यावर मंत्री केसरकर यांनी घाटमार्गा बाबत सखोल माहिती घेतो मी यापूर्वी मार्गाच्या सर्व्हे साठी निधी दिला आहे. तो सर्व्हे अहवाल आला असेल त्यानंतर अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहाणी करूया हा घाटमार्ग झाला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. निधीची कुठेही कमतरता येणार नाही हा घाटमार्ग प्रश्न मार्गी लावू असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. माझे आणि पाटगाव चे जवळचे नाते असून भद्रकाली देवी आजोळची देवी आहे. त्या निमित्ताने येणे होत आहे. घाटमार्गाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन ही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!