🛑 कोणाच्याही धमक्यांना भिऊन नियम शिथिल केले असे कोणाला वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम असेल ; पालकमंत्री उदय सामंत
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-१८ :- सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाँझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नियम शिथिल करण्यात आले असून, कोणाच्याही धमक्यांना भिऊन हे सुरू केले आहे असे वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम असेल असा टोलाही पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांना लगावला आहे. व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही चुकीची स्वप्ने पाहू नयेत असे देखील पालकमंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

