आमसभा चालवली नाही, पळवली!” – आमदार निलेश राणे यांचा प्रशासनावर धडाकेबाज धडाका
अनुपस्थित अधिकाऱ्यांना सुनावला दम; “मागील दहा वर्षांची ढिलाई आता चालणार नाही”
कुडाळ –
कुडाळ तालुक्यात पार पडलेली सर्वसाधारण आमसभा यावेळी केवळ औपचारिक न राहता थेट कृतीकेंद्रित ठरली, याचे श्रेय आमदार निलेश राणे यांच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेला दिले जात आहे. सभेचे संचालन करताना त्यांनी केवळ चर्चा न करता प्रशासनाला अक्षरशः धावपळ लावली.
सभेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार राणे यांनी संताप व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत सुनावले. “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता माफी नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करताना त्यांनी “मागील दहा वर्षांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. केवळ आश्वासनांवर न थांबता, ठोस कृती आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश देत त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावले.
सभेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत, त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. या धडाकेबाज भूमिकेमुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
कुडाळ तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत, प्रशासनाला जबाबदार धरणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, “नेतृत्व असेच असावे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

